पत्रकार ‘आत्मसन्मान’ कार्यालयात गहाण ठेवून कुटुंब चालवण्यासाठी कसेबसे दिवस ढकलत आहेत आणि ‘चौथा स्तंभ’ म्हणून लोकशाहीचे ओझे वाहत असल्याचे उसने अवसान आणत आहेत…

जांभेकर, टिळक-आगरकरांची पत्रकारिता आता राहिली नाही. वर्तमानपत्र हे आता एक विकाऊ ‘प्रॉडक्ट’ बनले आहे. त्याच्याकडून समाजसुधारणेची अपेक्षा बाळगणे अनाठायी. आता पत्रकारितेची उद्दिष्ट्ये काय, तर ‘टू इन्फॉर्म, एज्युकेट अँड एन्टरटेन’. त्यातही ‘इन्फॉर्म’ आणि ‘एन्टरटेन’ हे एकत्र करून ‘इन्फोटेनमेंट’ हा प्रकार चालू आहे. तोही अगदी ‘सुमार दर्जा’चा. याला पत्रकार जबाबदार आहेत, तसेच प्रसारमाध्यमांचे मालकही.......